संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojna Maharashtra
संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojna Maharashtra:
नमस्कार मित्रांनो आज आपण अशी योजना पहाणार आहोत की त्यामुळे समाजातील सर्व सामान्य नागरिकांना या योजनेचा फायदा होईल.आपल्या समाजातील दुर्बल घटक म्हणजे निराधार नागरिक , आर्थिक दृष्ट्या दुर्बल ज्यांना कुणाचाही आधार नाही असे, विधवा महिलांसाठी, घटस्फोटीत महिला, पोटगी न मिळालेल्या महिला, समाजातील गरीब कष्टकरी शेतकरी बंधू आणि भगिनींना, तसेच अपंग व्यक्तींना उदरनिर्वाह चालवता यावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित ही योजना आहे.या योजनेअंतर्गत पूर्वी ५००ते७००रुपये मिळायचे आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे कोणीही या योजनेपासून वंचित राहू नयेत म्हणून हा एक प्रयत्न आहे.तर या योजनेत लाभ घेणाऱ्या नागरिकांना काय कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच काय पात्रता असावी ते आपण पाहणार आहोत.
![]() |
| संजय गांधी निराधार योजना आता महिन्याला मिळणार १०००/ रुपये |
पात्रता:
१.या योजनेअंतर्गत पात्र महिला ६५ वर्षे वयाच्या कमी असावी.
२ कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २१००० रुपये पेक्षा कमी असावे.
३.एक व्यक्ती निराधार कुटुंबाला ६००/रुपये प्रति महिना एका पेक्षा अधिक निराधार महिला ९००/ प्रति महिना वेतन राहील.
४.अपंग व्यक्ती, क्षयरोग, कर्करोग,HIV+, कुष्ठरोग या आजारांमुळे स्वतः चे कुटुंब चालू न शकलेले स्त्री आणि पुरुष.
निराधार महिला व निराधार पुरुष, विधवा, घटस्फोटीत महिला, घटस्फोटीत परंतु पोटगी न मिळालेल्या महिला
कमी उत्पन्न असलेल्या महिला
वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
शेतमजूर महिला
आत्महत्या केलेल्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या स्त्रिया.

Post a Comment